शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

आटपाडीच्या नशिबात टंचाई लाभाचा दुष्काळ! खरीप पैसेवारीवर टंचाई घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:12 IST

सांगली : पैसेवारी जाहीर करताना घेण्यात येत असलेला खरीप हंगामाचा आधार, पीक पाहणी अहवालावेळीच नेमकी ५० पैशांपेक्षा जादा लागलेली पैसेवारी आणि वर्षानुवर्षे यात बदल झाला नसल्याचा

ठळक मुद्देपीक कापणी प्रयोगाने केला घात

शरद जाधव ।सांगली : पैसेवारी जाहीर करताना घेण्यात येत असलेला खरीप हंगामाचा आधार, पीक पाहणी अहवालावेळीच नेमकी ५० पैशांपेक्षा जादा लागलेली पैसेवारी आणि वर्षानुवर्षे यात बदल झाला नसल्याचा फटका आटपाडी तालुक्याला बसत आहे.बुधवारी शासनाने जिल्ह्यातील २८५ गावांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. मात्र, टंचाईच्या सर्वाधिक झळा सोसणाऱ्या आटपाडी तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश नाही. रब्बी तालुका यादीत असलेला समावेश आणि खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगाने आटपाडीचा घात केला आहे.

बुधवारी राज्य शासनाने जिल्ह्यातील २८५ गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. दुष्काळ जाहीर केलेल्या गावात मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर व जत तालुक्यातील गावांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या भागाइतकीच किंबहुना अधिक टंचाई परिस्थिती असलेल्या आटपाडी तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश नाही.याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, खरीप हंगामात पीक कापणी प्रयोग घेतले जातात. त्यानुसार त्या भागातील पैसेवारी ठरत असते. तो अहवाल शासनाला सादर करून टंचाई जाहीर होत असल्याचे सांगण्यात आले.आटपाडी तालुक्यात खरीप हंगामावेळी पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. त्यावेळी तेथील पैसेवारी ५० पैशांपेक्षा जादा लागल्यानेच दुष्काळ जाहीर करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. 

शास्त्रोक्त पध्दतीने पीक कापणी प्रयोग घेतले जातात, त्यानंतरच पैसेवारी ठरविली जाते. यासंदर्भात शासनाची तत्त्वे आहेत. आटपाडी तालुक्यात रब्बीच्या गावांची संख्या जास्त आहे. जाहीर झालेल्या गावांमध्ये आटपाडीचा समावेश नसला तरी तालुक्यातील अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणार आहे.- विजयकुमार काळम-पाटील, जिल्हाधिकारीदुष्काळ जाहीर केलेल्या यादीत आटपाडी तालुक्याचा समावेश नाही, हे अन्यायकारक असून, याविरोधात आवाज उठविणार आहे. शासनदरबारी प्रयत्न करून आटपाडीचा समावेश करण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करायला हवे होते. त्यांचे अपयश दिसून येत आहे. कामाचे जसे श्रेय आमदार घेतात, तसे या अन्यायाचेही श्रेय त्यांनी घ्यावे. तालुक्यात टंचाई असतानाही लाभ मिळणार नाहीत, यास आमदार जबाबदार आहेत.- अमरसिंह देशमुख, माजी जि. प. अध्यक्ष, आटपाडी

टॅग्स :Sangliसांगलीfarmer suicideशेतकरी आत्महत्या